निळवंडेच्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून पाझर तलाव, बंधारे,ओढे तुडुंब
शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या देखील अपेक्षा वाढल्या
कोपरगाव ,( लक्ष्मण वावरे )
:कोपरगाव मतदार संघातील निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना मोठा दिलासा मिळाला असून आ.आशुतोष काळे यांनी समय सूचकता दाखवत पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेवरून लाभक्षेत्राच्या सर्व गावातील पाझर तलाव,साठवण बंधारे, ओढे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्याबद्दल काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी,
.चालू वर्षी मे आणि जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाच्या चिंता मिटल्या होत्या व भूजल पातळी देखील टिकून असल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या देखील चिंता उरल्या नव्हत्या त्यामुळे शेतकरी निर्धास्त झाले होते. परंतु मागील काही वर्षापासून लहरी झालेला पाऊस कधी गायब होईल याचा काही नेम नव्हता.
मे आणि जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे जुलै महिन्यातच भरली जावून जायकवाडी धरणात देखील अपेक्षेपेक्षा जास्त पाणी वाहून गेल्यामुळे जायकवाडी धरण देखील जुलै महिन्यात ८० टक्याच्या वर पोहोचले जावून जायकवाडी धरणात ओव्हर फ्लोचे पाणी सुरूच होते. याच ओव्हर फ्लोच्या पाण्यातून लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव,साठवण बंधारे, ओढे पूर्ण क्षमतेने भरून घेतल्यास भूजल पातळी वाढली जावून पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाच्या चिंता पण मिटणार होत्या. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेवरून लाभक्षेत्राच्या सर्व गावातील पाझर तलाव, साठवण बंधारे, ओढे पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले आहेत. उर्वरित गावातील पाझर तलाव व साठवण बंधारे भरण्यासाठी आवश्यक असलेली सिमेंट पाईप लाईन करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु असून त्या गावांना देखील बंधारे भरण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे.
दीर्घ काळापासून पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी,





