ट्रकची मोटरसायकलला धडक; पती- पत्नीचा जागीच मृत्यू
घटनास्थळाची दृश्य मन विचलित करणारी
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव -संगमनेर रस्त्यावर शहापूर शिवारात ट्रक व मोटरसायकलचा अपघात होऊन संगमनेर तालुक्यातील पती-पत्नी जागेवरच ठार झाले ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर संगमनेरच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक एच.आर.७४ बी ६२१८ याने मोटरसायकल क्रमांक एम.एच १५ इ.वाय.८०९८ यास पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत मोटरसायकल वरील सर्जेराव शांताराम सोनवणे(वय-४०) व रुपाली सर्जेराव सोनवणे (वय-३५) रा
वेल्हाळे तालुका संगमनेर हे दोघे पती-पत्नी जागेवरच ठार झाले.
सर्जेराव सोनवणे यांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेले तर त्यांच्या पत्नी रुपाली सोनवणे यांच्या अंगावरूनही ट्रक गेली. याबाबत शहापूरचे पोलीस पाटील भागवत खंडीझोड यांनी शिर्डी पोलीसांना कळविले.पोलीसांनी घटनास्थळी येत घटनेचा पंचनामा केला.ट्रकचालक घटना घडल्यानंतर पळुन चालला होता मात्र स्थानिकांनी त्यास पकडले.
हा रस्ता अतिशय खराब आहे.खराब रस्त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात.अजुन किती बळी गेल्यानंतर या रस्त्याचे काम संबधित विभाग करणार या रस्त्यावरुन चालताना वाहन चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत असल्याने रस्त्याचे काम करण्याची मागणी प्रवास्यांनी केली आहे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव -संगमनेर रस्त्यावर शहापूर शिवारात ट्रक व मोटरसायकलचा अपघात होऊन संगमनेर तालुक्यातील पती-पत्नी जागेवरच ठार झाले ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर संगमनेरच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक एच.आर.७४ बी ६२१८ याने मोटरसायकल क्रमांक एम.एच १५ इ.वाय.८०९८ यास पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत मोटरसायकल वरील सर्जेराव शांताराम सोनवणे(वय-४०) व रुपाली सर्जेराव सोनवणे (वय-३५) रा
वेल्हाळे तालुका संगमनेर हे दोघे पती-पत्नी जागेवरच ठार झाले.
सर्जेराव सोनवणे यांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेले तर त्यांच्या पत्नी रुपाली सोनवणे यांच्या अंगावरूनही ट्रक गेली. याबाबत शहापूरचे पोलीस पाटील भागवत खंडीझोड यांनी शिर्डी पोलीसांना कळविले.पोलीसांनी घटनास्थळी येत घटनेचा पंचनामा केला.ट्रकचालक घटना घडल्यानंतर पळुन चालला होता मात्र स्थानिकांनी त्यास पकडले.
हा रस्ता अतिशय खराब आहे.खराब रस्त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात.अजुन किती बळी गेल्यानंतर या रस्त्याचे काम संबधित विभाग करणार या रस्त्यावरुन चालताना वाहन चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत असल्याने रस्त्याचे काम करण्याची मागणी प्रवास्यांनी केली आहे





