पाण्याच्या तक्रारी येणार नाहीत याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी --आ.आशुतोष काळे
निळवंडे कालवा पाणी नियोजन बैठक
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
. मागील वर्षी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांनी उत्तम नियोजन केल्यामुळे भर उन्हाळ्यात देखील निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी टंचाई जाणवली नाही.त्याच धर्तीवर यावर्षी देखील योग्य नियोजन करून निळवंडे कालव्याचे पाणी लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात पोहोचवा ,पाण्याच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत याची निळवंडेच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
. मागील वर्षी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांनी उत्तम नियोजन केल्यामुळे भर उन्हाळ्यात देखील निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी टंचाई जाणवली नाही.त्याच धर्तीवर यावर्षी देखील योग्य नियोजन करून निळवंडे कालव्याचे पाणी लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात पोहोचवा ,पाण्याच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत याची निळवंडेच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी निळवंडेच्या इंजिनिअर विभागाचे कार्यकारी अभियंता हापसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून नियोजित वितरीकांचा आराखडा तयार करून त्या आराखड्यास मंजुरी घेण्याच्या सूचना केल्या. सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कालव्यांवर तातडीने एस्केप तयार करून घ्यावेत. जेणेकरून भविष्यात प्रत्येकवेळी कालवे फोडण्याची वेळ येणार नाही व पाणी देतांना कोणत्याही अडचणी येणार नाही.
मात्र पाण्याच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत याची निळवंडेच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जवळकेचे माजी सरपंच बाबुराव थोरात,रांजणगाव देशमुखचे सरपंच गजाजन मते, अंजनापुरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक संतोष वर्पे, संपतराव खालकर, निळवंडे पाटबंधारे विभागाचे अभियंता महेशजी गायकवाड, शाखा अभियंता साबळे आदी अधिकारी व लाभक्षेत्रातील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.



.jpg)




