कोपरगांव [ लक्ष्मण वावरे ]
आपल्या आमदारकीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्व जाती धर्माला न्याय देत बरोबर घेऊन कोपरगाव शहरासह मतदार संघातील विकासाचे बहुतांश प्रश्न मार्गी लावले विकासाचे अजून अनेक प्रश्न सोडवून घ्यायचे असल्याने त्यासाठी पुन्हा आशुतोष काळेच आमदार हवे असुन मतदार संघाची विकसित मतदार संघ म्हणून ओळख निर्माण करणा-या आ.आशुतोष काळे यांनाच आपला लोकप्रतिनिधी म्हणून मोठ्या मताधिक्क्याने निवडून देणाचा निश्चय सुज्ञ मतदारांनी केला असल्याचे बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन यांनी एका सभेत सांगितले .
कोपरगाव शहारातील गांधीनगर परिसरात आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, आ. आशुतोष काळे यांनी व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देतांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वत:ची यंत्रणा उभी करून मतदार संघातील एकही लाडकी बहिण वंचित राहणार नाही याची काळजी घेतली. मतदार संघातील जनतेचा एवढा बारीक विचार करणारा नेता आ.आशुतोष काळे यांच्या सारखा कुटुंब प्रमुख आपल्याला मिळाला असल्याचे सांगत
झालेल्या विकासाची परतफेड करतांना त्यांना एवढे मताधिक्य दया कि, ते मताधिक्य मोठे असले पाहिजे असल्याचेही आवाहन श्री.ञिभुवन यांनी केले. याप्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते




