जनतेला समस्यांच्या वाऱ्यावर सोडून आमदार काळे गायब - नितीन शिंदे, प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
विधानसभेत आयतेच जांभूळ तोंडांत पडल्याने त्याची किंमत नसणारे आमदार आशुतोष काळे हे बोटावर मोजण्या एवढे देखील तास मतदारसंघात थांबले नाही एकीकडे कोपरगाव शहरातला पाणी पुरवठा समस्या वाढत आहे.तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.नागरिकांना समस्या भेडसावत आहे. पोहेगाव सारख्या ठिकाणी भर दिवसा दरोडा पडला त्यानंतर अद्याप देखील आमदार उजेडात आलेले नाहीत.एकच जनता दरबार घेऊन तक्रारींचा ढिग व महापुर बघून जनतेला समस्यांच्या वाऱ्यावर सोडून आमदार गायब झाले असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रदेश सचिव,
काँग्रेसचे नेते नितीन शिंदे यांनी केली आहे.
महाविकास आघाडीने कमी काळात टोकाची लढाई दिली, राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या निवडूक प्रचारसभा दरम्यान कोपरगांवतील भव्य सभा व जनतेचा कल बघून काळे यांची धावपळ वाढवणारी कुणाच्या हि नजरेततून सुटली नाही पण कोल्हे यांच्या मदतीने काळे यांना निवडणूक विजयाचे फळ चाखता आले अन्यथा निकाल अनपेक्षित लागला असता याची त्यांना जाणीव आहे. आता निवडणूक संपली त्यामुळे पुन्हा जनतेला गृहीत धरून वागणे त्यांचे सुरू आहे. ते सत्तेची ऊब घेत आहे मात्र जनतेला आता समस्यांच्या कडाक्यात उभे केले आहे हे त्यांनी विसरू नये.



.jpg)




